तू किसी रेल सी गुजरती है,
मै किसी पूल सा थरथराता हूं
हे मसान मधलं गाणं ऐकत असता, त्या गाण्याचा इतिहास तपासून पाहिला तेव्हा या वरच्या दोन ओळी दुष्यंतकुमार यांच्या गझलेतून घेतल्याचे कळले. दुष्यंतकुमार हे काय प्रकरण पाहतांना रेख्तावर त्यांच्या काही गझला सापडल्या आणि एक सुंदर खजिना हाती लागला. हिंदी-उर्दू गझलेच्या क्षेत्रात काही थोड्या काळात भरीव कार्य केले आहे त्यांत, 'दुष्यंत कुमार' यांचं नाव अग्रक्रमाने घेतले जाते. हिंदी गझलेला वैभावाचे दिवस मिळवून देण्याचे कार्य दुष्यंतकुमार यांनी केलं.
०१ सप्टेंबर १९३३ ला उत्तरप्रदेशच्या बिजनौर मधल्या राजपूर नवादा मध्ये जन्मलेल्या दुष्यंतकुमार यांनी . इलाहाबाद विश्वविद्यालय मधून शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना आकाशवाणी भोपाळ येथे असिस्टंट प्रोड्युसर ची नोकरी मिळाली. भोपाळ हे शहर अतिशय प्रिय होतं त्या शहराबद्दल तिथल्या तलावांबद्दल त्यांना एक वेगळ्याच प्रकारची आत्मीयता होती. अतिशय साध्या सोप्या शब्दांत कविता/गझल लिहिणारे दुष्यंतकुमार हे क्रांतिकारी शायर/कवी म्हणून जास्त प्रसिद्ध होते. त्यांचा कल डाव्या विचारांकडे झुकणारा होता, जे त्यावेळी अगदी साहजिकच होतं .
दुष्यंतकुमार जेव्हा राजकारण्यांवर प्रहार करतात तेव्हा ते म्हणतात.
मस्लहम आमेज होते हैं सियासत के कदम
तू न समझेगा सियासत, तू अभी इंसान है”त्यांचे माझे आवडते शेर देतो आहे.
‘मुझमें रहते हैं करोड़ों लोग, चुप कैसे रहूँ
हर गज़ल अब सल्तनत के नाम इक बयान है”
”गूंगे निकल पड़े हैं जुबां की तलाश में
सरकार के खिलाफ ये साजिश तो देखिये”
”कैसे आकाश में सूराख हो नहीं सकता
एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो”
ये लोग होमो-हवन में यकीन रखते हैं
चलो यहां से चलें, हाथ न जल जाएं कहीं”राजकारणी, दांभिकता यांवर प्रहार करणारे दुष्यंतकुमार रोमँटिक शायरी पण तितक्याच ताकदीने लिहितात
एक आदत सी बन गई है तू
और आदत कभी नहीं जातीचांदनी छत पे चल रही होगी , अब अकेली टहल रही होगी
फिर मेरा ज़िक्र आ गया होगा,बर्फ़-सी वो पिघल रही होगीउण्यापुऱ्या ४२ वर्षाचं आयुष्य लाभलेल्या या शायराने सामान्य माणसासोबत केवळ हात नाही मिळवला तर त्याच दुखणं बोलतं केलं.
सलाम दुष्यंतकुमार